कराड : माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना नाइलाजाने काम करावे लागले असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्याबरोबर काम करायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे होते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांनी त्यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमवेत चार वर्षे वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाइलाजाने काम करावे लागल्याची खदखद अजित पवार यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. त्यावर काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सन २०१० ते २०१४ या कालावधीत आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. त्या वेळी या दोघांमधील ताणतणाव आणि विविध विषयांवरून उडालेले खटके हे गाजले होते. अखेर याच वादातून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करत सरकारचा पाठिंबा काढून घेत आघाडीतून बाहेर पडले होते. यानंतरही या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप यापूर्वीही घडलेले आहेत.

Eknath Shinde, narendra Modi, narendra Modi pm till 2034, Opposition, Spreading Misleading Propaganda, ekanth shinde praises narendra modi, ekanth shinde criticses maha vikas agahdi, washim lok sabha seat, lok sabha 2024,
“मोदी २०३४ पर्यंत पंतप्रधान राहतील,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; म्हणाले, “विरोधकांना जनताच…”
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला