अलिबाग- माथेरानमध्ये हात रिक्षा ओढणाऱ्या चालकांच्या हातात ई रिक्षाचे स्टेअरींग आले आहे. पहिल्या टप्प्यात २० ई रिक्षा हात चालकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे हात रिक्षांच्या कष्टप्रद जाचातून रिक्षा चालकांची सुटका होणार आहे.

माथेरानमधील हात रिक्षाची अमानवी प्रथा बंद व्हावी, आणि त्याऐवजी ई रिक्षा सरू व्हावी यासाठी माथेरान हात रिक्षा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने आजच्या युगात मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा कशा सुरू राहू शकतात असे म्हणत राज्यसरकारला फटकारले होते. यानंतर सुरुवातीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर माथेरानमध्ये ई रिक्षा चालविण्यास मंजुरी दिली होती. आता पुढील आदेश होत नाही तोवर ई रिक्षा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरूच ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये ई रिक्षा पुन्हा एकदा धावू लागली आहे. पण ई रिक्षा चालविण्यासाठी माथेरान नगर परिषदेने सुरवातीला ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यामुळे हात रिक्षा चालकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली होती. माथेरानच्या ई रिक्षा चालविण्यासाठी हात मिळावी यासाठी हात रिक्षा संघटना आग्रही होत्या. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले होते. रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक परमिट आणि परवानेही त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतले होते. मात्र हात रिक्षा चालकांना डावलून माथेरान नगर परिषदेनी पुन्हा एकदा ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्यामुळे हात रिक्षाचालकांना पुन्हा एकदा हातरिक्षाच ओढण्याची वेळ आली होती. त्यामुळे हात रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली होती.

हेही वाचा – लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ

हेही वाचा – शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “मी गेल्या एक वर्षापासून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ एप्रिलला झालेल्या सुनावणीत सर्वोच्य न्यायालयाने २० ई रिक्षा सुरू करण्यास परवानगी दिली होती. यानंतर निर्देशानंतर आता माथेरानचा ई रिक्षा प्रकल्प श्रमिक रिक्षा संघटनेच्या ताब्यात देण्यात आला आहे. हात रिक्षाचालकांनी पहिल्या टप्प्यात २० रिक्षा खरेदी केल्या असून, त्या सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या २० ई रिक्षांच्या सेवेचा शुभारंभ केला, अशी माहिती ई रिक्षासाठी न्यायालयात याचिका करणाऱ्या सुनील शिंदे यांनी दिली.