Maharashtra Rajya Sabha Election 2022 Updates : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान झालं. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली. त्यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळावा, असे प्रयत्न झाले परंतु, आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा आहे. परंतु ठाकूर यांनी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्यानं साशंकता आह़े. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस पाहायला मिळाली. शुक्रवारी (१० जून) रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर झाला नाही.