रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. पंतप्रधानपदी मोदी पुन्हा विराजमान व्हावेत यासाठी एक पोस्ट करत किरण सामंत यांनी माघार जाहीर केल्याची चर्चा आहे. किरण सामंत यांनी जर माघार घेतली तर नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला आहे अशीही चर्चा रंगली आहे. कोकणात रात्रीपासून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत किरण सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली नाही.

काय आहे किरण सामंत यांची पोस्ट?

नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार ४०० पारसाठी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार-किरण सामंत. असा दोन ओळींचा संदेश किरण सामंत यांनी लिहिला आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri sindhudurg lok sabha constituency kiran samant post viral on social media scj
First published on: 03-04-2024 at 09:02 IST