अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनीही अजित पवारांना समर्थन दिले आहे. रुपाली चाकणकरांचं नेतृत्व पाहता त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आले. दरम्यान, शरद पवारांनी त्यांचा फोटो वापरण्याबाबत आज मोठा निर्णय घेतला. या निर्णयावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहतील अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार अधिक संतापले. “माझ्या परवानगीशिवाय माझे फोटो कोणी वापरू नयेत”, असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे. ‘माझे फोटो माझ्या परवानगीनेच वापरावेत. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत, जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरवा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये’, अशी तंबीच शरद पवारांनी आज दिली. त्यामुळे अजित पवार गट यापुढे शरद पवारांचा फोटो वापरू शकणार नाहीत. याबाबत आज रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला असता “कार्यकर्ता म्हणून आम्हाला अधिकार आहे”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> “नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती…”, शिंदे गटातील आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले…

“शरद पवार आमचे दैवत आहेत. साहेबांचे आशीर्वाद घेऊनच संघटनेपासूनचं राजकारण केलं. माझ्यासारख्या तमाम कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच समाजकरण केलंय. आजही ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि दैवत आहेत. आमच्या मनात त्यांचं स्थान आहे. कार्यकर्ता म्हणून आम्हाला (फोटो वापरण्याचा) अधिकार आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात राडा?

दरम्यान प्रतापगड बंगला अजित पवार गटाचे कार्यालय म्हणून जाहीर करण्यात आले. परंतु, हा बंगला ताब्यात घेण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. परंतु, हा राडा दोन गटांच्या कार्यकर्त्यांमुळे झाला नसून कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने गोंधळ झाल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं. “आज पक्ष कार्यालयामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे दरवाजा तुटला. फर्निचर तुटलं. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. ते उत्साही असतात. प्रचंड गर्दीमुळे हे झालेलं आहे”, असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकरांनी दिलं.