Sanjay Raut: सध्या पहिलीपासून हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत साहित्यिकांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंं आहे. या सगळ्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू असं म्हटलं आहे. तसंच मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का बसले आहेत? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला बळ कसं मिळेल हे पाहिलं पाहिजे-संजय राऊत

देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वात आधी मराठी शाळांची जी दुरवस्था आहे त्याबाबत काम केलं पाहिजे. मराठी भाषेला कसं बळ कसं मिळेल आणि मराठी माणूस, मराठी मातीत सन्मानाने कसा जगू शकेल हे पाहिलं पाहिजे. तो अदाणी, लोढा यांचा गुलाम बनू नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी येतं. महाराष्ट्र आणि हिंदी यांचं वैर असतं तर हिंदी चित्रपट, साहित्य, शाळा या सगळ्याला इतकं प्राधान्य दिलं पाहिजे.

मुंबई आणि महाराष्ट्राला हिंदी कुणी शिकवण्याची गरज नाही-राऊत

देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वात आधी मराठी शाळांची जी दुरवस्था आहे त्याबाबत काम केलं पाहिजे. मराठी भाषेला कसं बळ कसं मिळेल आणि मराठी माणूस, मराठी मातीत सन्मानाने कसा जगू शकेल हे पाहिलं पाहिजे. तो अदाणी, लोढा यांचा गुलाम बनू नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी येतं. महाराष्ट्र आणि हिंदी यांचं वैर असतं तर हिंदी चित्रपट, साहित्य, शाळा हे सगळं चाललं असतं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असंही राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का?

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारणच नाही. देवेंद्र फडणवीसांना दहा साहित्यिकांची नावं माहीत आहे का? साहित्यिकांना मराठी भाषेबाबत चिंता असती तर जो दबाव चालला आहे त्याबाबत साहित्यिकांनी आवाज उठवला असता. प्रकाश राज हा कलाकार बोलतो आहेच ना? नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित कुठे आहेत? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आणि मराठीवर असे हल्ले होत असताना तुम्ही गप्प बसता? फडणवीसजी आम्हाला साहित्यिकांबाबत काही सांगू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रशांत दामले, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित यांची नावं घेत आता संजय राऊत यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याबाबत हे कलाकार काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.