संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडते आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळेंच्या आरोपाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या पत्रकार परिषदेमुळे असं कोणतं वातावरण बिघडलंय? हे मला बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगितलं, तर मी त्यांचे ऐकेन, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी शंभूराज देसाईंनाही प्रत्युत्तर दिलं. टीव्ही ९ वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…हे अजिबात चालणार नाही”, सीमाप्रश्नावरून सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपाला सुनावलं; लोकसभेत खडाजंगी!

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : निवडणुकीत मुख्य मुद्दयांचा विसर
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर

काय म्हणाले संजय राऊत?

“चंद्रशेखर बावनकुळे हे आमचे चांगले मित्र आहेत. ते संयमी गृहस्थ आहेत. असं बोलण्यामागे त्यांची मजबुरी आहे. पण माझ्या पत्रकार परिषदेमुळे असं कोणतं वातावरण बिघडलं आहे? कर्नाटकला धडा शिकवा, राज्यपालांना पदावरून हटवा, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कारवाई करा, असं बोलण्याने वातावरण कसं बिघडेल? हे मला बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगितलं, तर मी ऐकायला तयार आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

हेही वाचा – ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जेलमध्ये राहिल्याने…”

“मुळात जे प्रश्न मी विचारतो आहे, तेच प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत. उदयनराजे असतील किंवा संभाजीराजे असतील, हे सुद्धा याच विषयांवर बोलत आहेत. त्यामुळे बावनकुळेंनी अभ्यास करायला हवा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राऊतांच्या ‘नामर्द सरकार’ टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले “स्वत:ला उपमा देण्याचे…”

यावेळी बोलताना त्यांनी शंभूराज देसाईंनाही प्रत्युत्तर दिलं. “मला तुरुंगात पाठवणारे तुम्ही कोण आहात? याचा अर्थ तुम्ही खोटे प्रकरणं, खोटे पुरावे तयार करत आहात. न्यायालये, कायदा, तपास यंत्रणांना दबावाखाली घेऊन आपल्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्यासाठी हे सर्व घडवलं जात आहे, हे मंत्र्यांच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे. मला जामीन देताना न्यायालयानेही हेच सांगितलं आहे”, असेही ते म्हणाले. तसेच यासंदर्भात मी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.