राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाने पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलं. यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावर एका वाक्यात मिश्किल टिपण्णी केली. शरद पवार म्हणाले, “ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत.” ते रविवारी (८ जानेवारी) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले.”

“हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते”

“महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

“भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही”

“ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही,” असा आरोप शरद पवार यांनी केला.

भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?

राज्यपालपद हे माझ्यासाठी अयोग्य असून राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दुखं आहे, यात कोणतेही सुख नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शुक्रवारी (६ जानेवारी) राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना ते बोलत होते.

हेही वाचा : “बायकोने इतका हस्तक्षेप केला की, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं”, शरद पवार-संजय राऊतांचं नाव घेत मनसे नेत्याचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी?

राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दुखं आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली.