दहशतवाद रोखणारी ‘छाती’ असतानाही पुलवामा घडले असा हल्लाबोल शिवसेना मुखपत्र सामनातून केला आहे. सोमवारी शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीनंतर सामनाच्या पहिल्याच आग्रलेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. भाजपाशिवाय सिद्धू यांचा उल्लेख बेलगाम बोलणारा माणूस असा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी आज विद्यमान पंतप्रधानांची आहे, असे कुणी म्हटले तर ते समजून घेतले पाहिजे. पुण्यातील नक्षलवाद्यांकडून पंतप्रधानांच्या जिवास धोका असल्याचा ‘ई-मेल’ आमचे गुप्तचर पकडतात व पंतप्रधानांचा जीव वाचवतात, पण चाळीस जवानांना घेऊन जाणार्‍या बसवर दिवसाढवळ्या हल्ला होणार याची खबर लागत नाही. दहशतवाद रोखणारी ‘छाती’ असूनही पठाणकोटनंतर उरी घडले व उरीनंतर आता पुलवामा घडले. पंतप्रधानांसह इतर व्ही.आय.पी. मंडळींच्या सुरक्षेची चिंता केली जाते, पण जवान मात्र अतिरेक्यांच्या हल्ल्यात मरण पावतात. असे काही प्रश्न शिवसेना मुखपत्र सामनामध्ये उपस्थित केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena criticise bjp and modi
First published on: 19-02-2019 at 06:41 IST