भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पार्टीत महिलांना मान-सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ठाकूर म्हणाल्या की, “आम्ही भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा प्रकार बघितला. मान खाली घालायला लावणारा हा प्रकार आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर मला चित्राताईंची फार आठवण झाली. चित्राताई आता यावर प्रतिक्रिया देणार की नाही? असा प्रश्न पडला.”

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

भाजपावर टीका करताना पुढे त्या म्हणाल्या, “एकंदरीत आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील म्हणतात महिलांनी स्वयंपाक घरात जायला पाहिजे. यानंतर आता जिल्हाध्यक्ष अशी प्रकरणं करत आहेत. तसंही तुम्ही बघितलं तर ते ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षात महिलांना फार मान-सन्मान असतो, अशातला हा भाग नाहीये. आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, पण अशी प्रकरणं लज्जास्पद आहेत. तेही सोलापूर सारख्या शहरात जिथे पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत, तिथला भाजपाचा जिल्हाध्यक्ष अशा प्रकारची कृत्यं करतो, हे निषेधार्य आहे,” असंही ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा- भाजपा पदाधिकारी श्रीकांत देशमुखांवर महिलेचे गंभीर आरोप; हॉटेलमधील VIDEO आला समोर

पुढे त्यांनी म्हटलं, “आता यामध्ये गंमत अशी आहे की, सगळ्यांना एकापाठोपाठ एक क्लीन चीट मिळतेय. त्यामुळे आपण त्यांना ‘क्लीन चीट’ सरकार म्हटलं पाहिजे का? हे ‘ईडी सरकार’ तर आहेच. आधी ईडी लावायची, मग क्लीन चीट द्यायची. या सगळ्या गोष्टी संविधानाला आणि लोकशाहीला तडा देणाऱ्या आहेत. त्यांमुळे जनसामान्यांनी विचार करायला हवा. जो संविधानाचं आणि संस्कृतीचं पालन करतो, त्याच्या पाठीमागे उभं राहायला.”