Supriya Sule : अमेरिकेतली एक बातमी समोर आली आहे. तिथल्या महिलांना जर का भारतात जायचं असेल तर त्यांनी विचार करुन गेलं पाहिजे कारण भारतात महिला सुरक्षित नाहीत. हे मी म्हणत नाही तर अमेरिकेतली बातमी सांगते आहे, त्यातली माहिती सांगते आहे. अशा बातम्या बाहेरुन येत आहेत तर काहीतरी घडतं आहे ना? महिला जर आजही असुरक्षित असतील तर आपण समाज म्हणून उभं राहण्याची गरज आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाचाही उल्लेख आपल्या भाषणात केला.

वैष्णवी हगवणे प्रकरणाचा उल्लेख करत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं त्यात त्या मुलीला ९ महिन्यांचं मूल होतं. तिचा छळ होत होता. त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता मी गेले नाही कारण त्यांच्या मोठ्या सुनेने तक्रार सहा महिने आधीच केली असती. मला वाटतं की त्यांच्या मोठ्या सुनेने केलेली तक्रार पोलीस स्टेशनने घेतली असती तर आज त्यांची दुसरी सून (वैष्णवी) जिवंत असती. मुलाच्या बाजूचे जे होते त्यांना व्हियाआयपी ट्रिटमेंट मिळत होती आणि जी मोठी सून मार खात होती तिला बाहेर बसवलं होतं. हा कुठला न्याय आहे मला समजत नाही. घाबरत घाबरत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. हुंडामुक्त महाराष्ट्र कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्या लेकी-सुना मार खाणार असतील तर काय करायचं? हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. “

लग्नाच्या रुखवताजवळ गाडी दिसली तर विचारायचं…..

जुलै महिन्यापासून पुढील एक वर्षे संपूर्ण शाळा कॉलेज संस्था मिळून पूर्ण ताकदीने हुंडा विरोधी मोहीम आपल्याला चालवयाची आहे.आपण जेव्हा लग्नाला जातो तर तिथे आधी विचारायचं हुंडा घेतला का? किंवा दिला का? त्याने सांगितले हो तर आपण त्या लग्नाला जायचं नाही. लग्नाचा रुखवत दाखवतात. तिथं गाडी दिसली तर विचारायचं कोणाच्या नावावर आहे कोणी दिली…? आता जी घटना पुण्यात झाली. त्या हगवणे कुटुंबाचे आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध पण, आज सुशिक्षित कुटुंब, सुना अशा घरात जर मुलगी माहेरी गेली तर सारखं माहेरून गाडी घेऊन ये ,मोबाईल घेऊन ये, तुला मोबाईलवर बोलायचं आहे. तर तू तुझ्या हिमतीवर घे ना, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

जुलै महिन्यापासून पुढील एक वर्षे संपूर्ण शाळा कॉलेज संस्था मिळून पूर्ण ताकदीने हुंडा विरोधी मोहीम आपल्याला चालवयाची आहे.आपण जेव्हा लग्नाला जातो तर तिथे आधी विचारायचं हुंडा घेतला का? किंवा दिला का? त्याने सांगितले हो तर आपण त्या लग्नाला जायचं नाही. लग्नाचा रुखवत दाखवतात. तिथं गाडी दिसली तर विचारायचं कोणाच्या नावावर आहे कोणी दिली…?

सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांच्या बाबतीत गुन्हे वाढले आहेत हे चिंताजनक

८ मार्चला महिला दिन असतो, पण २२ जूनला आम्ही हा कार्यक्रम करत असतो, देशात पहिल्यांदा याच दिवशी महिला धोरण राबविण्यात आले होते, निर्णय प्रक्रियेत त्या आल्या होत्या. सायबर क्राइम हा त्या वेळी विषय नव्हता,आता मोबाईलमुळे महिलांच्या बाबतीत अनेक क्राइम वाढले आहेत. यात सायबर क्राईम हा मुद्दा वाढवला. आता DBT चे पैसे थेट महिलांच्या खात्यात येतात आधी ते नव्हते. लाडकी बहीण योजनेमुळे पैसे मिळाले चांगलं आहे, पण सामाजिक परिवर्तन झाले का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी सरकारवर टीका करत नाही, पण महिलांच्या आयुष्यात काय मोठा यामुळे बदल झाला. २१०० रुपये कधी देणार त्यांना वाटेल तेव्हा, जसे शेतकरी कर्जमाफीला म्हणतात, वेळ येईल तेव्हा देऊ याला साडेचार वर्ष जातील त्यांची वेळ यायला. सरकार माध्यमातून अनेक निधी दिले महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.