आधी निसर्ग चक्रीवादळ नंतर करोनाची साथ आणि आता महाडची इमारत दुर्घटना अशा एकामागून एक आपत्ती रायगड जिल्ह्यावर ओढावत असतांना, तीन महिलांनी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगडच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रतिकूल परिस्थिती देखील व्यवस्थितपणे हाताळली आणि प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी हाताळण्यातही महिला कमी नाहीत याची चुणूक दाखवून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकट येतात, तेव्हा ती चहू बाजूनी येतात, अशा प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता नेटाने सामोरे जायचे असते. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. आधी निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्याची धुळधाण उडवली.  अर्धा रायगड वादळाच्या तडाख्याने उध्वस्त झाला. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २४ हजारांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाड, माणगाव, गोरेगाव, रोहा अलिबाग परिसराला पूराचा तडाखा बसला आणि आता महाड येथे पाच मजली इमारतच कोसळली. संकटांची मालिकाच जणू रायगडकरांच्या मागे लागली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत तीन महिलांनी रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थापनाची जबाबदारी नेटाने संभाळल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those three who competently faced the disasters in raigad district msr
First published on: 28-08-2020 at 11:53 IST