रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु झाला. हा अपघात रविवारी सकाळी कळंबोली येथे झाला. या अपघातात दोन मुली जखमी झाल्या आहेत.
आंध्रप्रदेश येथे राहणारे विश्वनाथ राव हे आपल्या कुटुंबासह खासगी बसने पुण्याला जात होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास बसचालकाने राव कुटुंबाला चुकून कळंबोली येथे उतरवले. त्यामुळे राव कुटुंब रस्त्याच्या बाजूने पुढे जात होते. त्यावेळी कोंबडय़ांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने राव कुटुंबाला जोरात धडक मारली.
या अपघातात विश्वनाथ राव (वय ४५), शिला राव (वय ३५) आणि कांता (वय ४५) यांचा मृत्यू झाला. या अपघातात प्रतिमा (वय २३) ही किरकोळ जखमी झाली. तीच्यावर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सूरू आहेत. राव यांच्या कुटूंबातील अमुल्य ही मुलगी अपघातात बचावली असल्याचे माहिती कामोठे पोलीसांनी दिली. या अपघाताप्रकरणी कामोठे पोलीस टेम्पोचा फरार चालक राजू याचा शोध घेत
आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
कळंबोली येथे टेम्पोच्या धडकेने तीन ठार
रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु झाला.
First published on: 03-02-2014 at 01:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in kalamboli accident