अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे अकलापूर येथील दुधवडे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावाअंतर्गत येणाऱ्या मुंजेवाडी येथे गुरुवारी (९ जून) दुपारी वादळी पाऊस झाला. या पावसाने दुधवडे कुटुंबातील तिघांचा बळी घेतला. मृतांमध्ये १० वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. विठ्ठल दुधवडे (७५ वर्षे), हौसाबाई दुधवडे (67 वर्षे) व साहील दुधवडे (१० वर्षे) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

हेही वाचा : दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडे उन्मळून पडली; तापमानात मोठी घट, हवाई वाहतुकीवरही परिणाम

संगमनेरमधील वादळी पावसाने दुधवडे कुटुंबावर मोठा आघात केलाय. संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त केलं आहे. यामध्ये जखमी असलेल्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people dead due to house collapse after heavy rain in sangamner ahmednagar pbs
First published on: 09-06-2022 at 23:05 IST