ढगांच्या गडगडाटासह पहाटे पाऊस कोसळला. लोक साखरझोपेत असताना सतत दोन रात्री अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे वीज गायब झाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सतत दोन दिवस भल्या पहाटे पाऊस कोसळत असून वीजही गायब होत आहे. आज तब्बल एक तास वीज गायब झाली होती. त्याशिवाय काही भागात विजेचा लपंडावदेखील सुरूच होता.या अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक नुकसानीत सापडला आहे. आंबा व काजू बागायतदारांचे त्यामुळे नुकसान होणार आहे. उशिराने आंबा बागायतींना फळे धरली, ती फळे अद्यापि परिपक्व झाली नसल्याने त्या बागायतदारांना अवेळी पावसाच्या दणक्याने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण बाजारपेठेत आंबा मात्र स्वस्त झालेला नाही. अजूनही सर्वसामान्यांना आंब्याची गोडी चाखायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. बागायतदारांना खाली कोसळलेले आंबे कॅनिंगला देण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले.या पावसाचा फटका सध्या करण्यात येणाऱ्या डांबरीकरणाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. खरे तर १५ मेनंतर डांबरीकरण केले जात आहे. पण सध्या डांबरीकरण करण्याच्या कामांचा धडाका लागला आहे. अवेळी पाऊस सुरू झाल्याने त्याला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncertain rain in sindhudurg district
First published on: 16-05-2016 at 01:29 IST