राहाता : निळवंडेचे पाणी येणार नाही, अशी टीका करणाऱ्यांना प्रत्यक्ष पाणी पाझर तलावामध्ये आणून उत्तर दिले आहे. मी जे ठरवतो तेच करतो आता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता या शेजाऱ्यांच्या प्रेमात पडू नका, असा सल्ला माजी खा. सुजय विखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव, निमोण भागातील शेतकऱ्यांना भोजापूर चारीचे पाणी दोन महिन्यांत देणार आहे. तसेच साकुर पठार भागासाठी वरदान ठरणाऱ्या साकुर उपसा जलसिंचन योजनाही लवकरच मार्गी लावणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

तालुक्यातील कोऱ्हाळे, डोऱ्हाळे वाळकी येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलाव्याच्या जलपूजन प्रसंगी डॉ. विखे बोलत होते. यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भागात निळवंडे धरणाचे पाणी आणूच शकत नाही असा आरोप ४० वर्ष विखे परिवारावर करण्यात आला. त्यासाठी आम्ही संघर्ष केला त्याला आता यश आले आहे. जिरायत भागातील शेतकऱ्यांनी एवढे वर्ष प्रतीक्षा व संयम बाळगल्याने आज त्याचा परिपाक असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विखे यांनी सांगितले की, पाण्यावरून कायमच टीका होत गेली, पाणी आल्याने ह्या टीकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री विखे पाटील हे शब्द पूर्ण करणारे नेते आहेत. निळवंडे घरण व कालव्यांची कामे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे. कालव्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाणी आपल्याला उपलब्ध झाले आहे. निळवंडेचे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. जोपर्यंत निळवंडेचे पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि तो आता पूर्ण झाला आहे. या भागाचे वातावरण पाहून काही जण इकडे आले. परंतु, त्यांचा उपयोग झाला नाही. येथील जनतेने विकासला आणि पाणी देणाऱ्या नेतृत्वाला अर्थात मंत्री विखे यांना आठव्यांदा मतदान करून दिले आहे. ज्यांनी विखेना विरोध केला, त्यांना त्यांची चूक समजली आहे. त्यामुळे तेही आपल्या सोबत येत आहे. आपण जे ठरतो तेच करतो आता शेजाऱ्यांच्या प्रेमात पडू नका, असा सल्ला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.