काहीही झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही. मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

भाजपाने यानंतर आंदोलन केली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केली. त्यासगळ्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की मी जे बोललो ते २ हजार टक्के वादग्रस्त बोललो नाही. अफझलखान १ लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. जिजाऊंनी महाराजांना सांगितलं माळरानावर अफझल खानाशी दोन हात करू नकोस. त्यानंतर विचार करून छत्रपती शिवरायांनी अफझल खानाच्या वकिलाला निरोप पाठवून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत अशी परिस्थिती निर्माण करून पाच जणांना हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. अफझल खान एवढा मोठा सरदार होता आदिलशाहीतला त्याला धारातिर्थी पाडण्याचा पराक्रम शिवरायांनी केला. त्यामुळे ते अफझल खानापेक्षाही मोठे झाले. शाहिस्तेखान लाल महालात होता पण त्याला कळलं नाही शिवाजी महाराज कधी लाल महालात शिरले आणि बोटं छाटून गेले. औरंगजेब इतकी वर्षे दिल्लीत होता. महाराष्ट्रातली एक इंच जमीन त्याला घेता आली नाही. त्यामुळे महाराज श्रेष्ठ ठरले हेच तर मी बोललो. मी काहीही चुकीचं बोललो नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatever happens i will not back down from my statement about chhatrapati shivaji maharaj said jitendra awhad scj
First published on: 06-02-2023 at 17:13 IST