आपल्या कुटुंबाबत प्रत्येक व्यक्तीच्या  मनात एक भीती असते. सामान्य माणसांना वाटणारी ही भीती मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानलादेखील वाटते. आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी तो चिंतीत असतो.
‘नीरजा’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग झाले. त्यावेळी आमिरला आयुष्यात कोणत्या गोष्टीची भीती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला असता तो म्हणाला की, मला आयुष्यात खूप गोष्टींची भीती वाटते. माझ्या जवळच्या किंवा कुटुंबातील व्यक्ती, माझी मुलं, माझी आई, किरण या सर्वांबाबत माझ्या मनात भीती असते. ही लोक कुठे बाहेर किंवा सहलीला गेल्यावर त्यांना काही होणार तर नाही ना असा विचार सतत मग माझ्या मनात असतो. मग हे सगळे घरी परतेपर्यंत मी त्यांना सतत फोन करत राहतो आणि त्यांची विचारपूस करतो. तसेच, माझ्या सर्वात जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर जाईल याची मला सर्वात जास्त भीती वाटते.