बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. २०१७ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. अनुष्काने लग्न केले तेव्हा तिचे वय फक्त २९ वर्ष होते. बॉलिवूड अभिनेत्रींसाठी हे वय खूप कमी मानले जाते.

नुकतंच ‘फिल्मफेयर’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने यामागचे कारण उलगडले. ती म्हणाली की, “मला असं वाटतं, बॉलिवूडचा प्रेक्षक खूप समजूतदार आहे. कलाकाराला स्क्रीनवर बघण्यातच त्यांची आवड आहे. तुमचं लग्न झालं आहे की नाही किंवा तुम्हांला मुलं आहेत की नाही याने त्यांना काही फरक पडत नाही. आपल्याला या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. एका अभिनेत्रींसाठी २९ हे लग्नासाठी कदाचित कमी वय असेल पण, मी लग्न केले कारण मी प्रेमात होते आणि आहे.”

Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न

ती पुढे म्हणाली की, “लग्न तर करायचेच होते. मी नेहमीच महिलांशी समान व्यवहार करावा या मताची आहे. जर अभिनेते लग्नाआधी फार विचार न करता त्यांचं काम सुरु ठेवतात तर, महिलांनीच का विचार करावा? मला आनंद आहे की, आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी लग्न केले आहे.”

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी लंडनला पोहोचली होती. दरम्यान, अनुष्काच्या वेगवेगळ्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.