बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी)’ पर्व ११ सध्या चांगलंच चर्चेत आहे. तसेच टीआरपी यादीमध्ये हा शो टॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या केबीसीला तिसरा करोडपती स्पर्धक मिळाला आहे. त्यानंतर शोच्या कर्मवीर स्पेशल भागात सुनिता कृष्णा यांना बोलवण्यात आले आहे. सुनिता यांनी शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टींचा खुलासा केला आहे ज्या ऐकून खुद्द अमिताभ बच्चन यांना देखील धक्का बसला. नुकतेच सोनी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कर्मवीर भागाचे दोन प्रोमो शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुनिता कृष्णा यांनी त्यांच्या जीवनातील धक्कादायक घटनांचा खुलासा केला आहे. 'मी १५ वर्षांची असताना माझ्यावर आठ जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता' असा खुलासा सुनिता यांनी केला. ते ऐकून समोर बसलेल्या अमिताभ बच्चन यांना देखील धक्का बसला. तर दुसऱ्या प्रमोमध्ये सुनिता यांनी देहविक्री व्यवसायात अडकलेल्या महिलांची सुटका करण्यासंबंधीचा अनुभव सांगितला आहे. View this post on Instagram Meet Karamveer Sunitha Krishnan and learn more about her anti-human trafficking efforts which have helped rehabilitate victims of this heinous crime on #KBCKaramveer Special, this Friday at 9 PM. @amitabhbachchan A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on Oct 16, 2019 at 6:14am PDT आणखी वाचा : करोडपती होताच स्पर्धकाची बिघडली तब्येत View this post on Instagram Karamveer Sunitha Krishnan shares stories of her activism and rescue of victims of trafficking. Watch her hold a mirror to the dark side of our society on #KBC11, tomorrow at 9 PM @amitabhbachchan A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on Oct 17, 2019 at 2:22am PDT 'सुनिता यांनी देहविक्री व्यवसायात अडकलेल्या २२ हजारांहून अधिक महिलांची सुटका केली आहे' अशी माहिती अमिताभ यांनी प्रोमोच्या सुरुवातीला दिली आहे. यावेळी सुनिता यांनी आपला अनुभव सांगताना एका एका साडेतीन वर्षाच्या मुलीची देहविक्री व्यवसायातून सुटका केल्याचं सांगितलं. तसंच "माझ्यावर आत्तापर्यंत १७ वेळा हल्ला झाला आहे. पण मला कधीच मरणाची भिती वाटली नाही. मी जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत मुलींचे रक्षण करत राहणार," असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.