जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. बॉलिवूड कलाकारांनीही या घटनेचा निषेध नोंदविला होता. दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहुती दिली होती. याच पार्श्वभूमीवर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सीआरपीएफने बॉलिवूडमधील काही कलाकारांसह एक गाणं चित्रीत केलं आहे. सीआरपीएफने अभिनेता अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आमिर खान यांच्यासह हे गाणे चित्रीत केले असून ''तू देश मेरा'' असे या गाण्याचे शीर्षक आहे. सीआरपीएफने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. Commendable work has been done by @SrBachchan, @aamir_khan and #RanbirKapoor for the tribute song #TuDeshMera dedicated to the Martyrs of Pulwama. We would like to thank you all for showing your support towards the Martyrs. pic.twitter.com/sw6MpDP05b — CRPF (@crpfindia) April 18, 2019 सीआरपीएफने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमधून रणबीर, आमिर आणि अमिताभ यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच तू देश मेरा'' या गाण्यामधून पुलवामा हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना हे गाणं समर्पित केल्याचंदेखील म्हटलं आहे.