आमिर खान त्याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. फोटो गॅलरीः आमिरने केले मरणोत्तर अवयवदानआता त्याने बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होता. यावेळी त्याने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जिवंत असताना तुम्ही चांगले काम केले नसेल, तर असे मृत्यूपूर्वी असे काही करा की लोकांच्या कायम स्मरणात राहील’, असे भावनिक आवाहन या वेळी आमिरने केले. हल्लीच एका कार्यक्रमात आमिरची पत्नी किरण राव हिनेही अवयदान करणार असल्याचे म्हटले होते. तिला ही कल्पना शीप ऑफ थिसस या चित्रपटद्वारे आल्याचे तिने सांगितले.