बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे त्यांच्या कलागुणांसोबतच हटके फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. त्यांना पाहून अनेक वेळा तरुणाईमध्ये ते ट्रेण्ड सेंटर ठरतात. या कलाकारांमध्ये प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचा देखील समावेश आहे. त्यांनी त्यांच्या गाण्यांनी अनेकांची मने तर जिंकली आहेतच त्याचसोबत त्यांचे सोन्यावरील प्रेम हे देखील सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. पण ते एवढे दागिने का घालतात माहितीये का? चला जाणून घेऊया…

बप्पीदा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढं सोनं घालण्यामागचं कारण सांगितलं.
आणखी वाचा : काय म्हणता? मुंबईत ‘देवमाणूस’मधील डॉ. अजित कुमारचे पुतळे

तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असं बप्पीदांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बप्पीदांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षादेखील अधिक सोनं असल्याचं सांगण्यात येत. बप्पीदा यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे.