‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. चित्रपटाने अलीकडेच २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. अलीकडेच अदा शर्माने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चित्रीकरण करताना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
husband, forceful sexual relationship, wife, mother in law, took picture, incident, case registered , panvel, khandeshwar, crime news, police, marathi news,
पनवेल : ‘त्या’ विकृत सासू विरोधात सूनेने केली अखेर फौजदारी तक्रार

अदाने फोटो शेअर करत लिहिलं आहे, “या चित्रपटाचे चित्रीकरण मायनस १६ डिग्री तापमानात करण्यात आलं होतं. तापलेलं ऊन त्यात ४० तास पाणी न प्यायल्यामुळे ओठ कोरडे पडून त्यांना भेगा पडल्या होत्या. एवढचं नाही तर जमिनीवर पडण्यासाठी खाली गादी टाकण्यात आली होती. मात्र, त्या गादीचा वापर न करता सरळ जमिनीवर पडल्यामुळे अदाच्या हाताचे कोपरे आणि गुडघ्यांना जखमा झाल्या होत्या.

हेही वाचा- Video : “माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहिलेले नाहीत, कारण…” शाहीद कपूरने केला खुलासा, म्हणाला…

अदा पुढे म्हणाली, शेवटच्या फोटोत तुम्ही बघू शकता, मी केसांना मूठ भरून नारळाचं तेल लावलं आहे आणि घट्ट वेणी घातली आहे. अदाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे फोटो बघून चाहते अदाने चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत आहेत.

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्यघटनेवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पश्चिम बंगालमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. १५ ते २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.