बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तो स्वत:चा खूप मोठा टीकाकार असल्याचं म्हटलं आहे. खरतर तर या अभिनेत्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा आजवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा अभिनेता म्हणजे आदित्य रॉय कपूर. आदित्याने आजवर चित्रपट, वेब सीरिजमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. आदित्यचा खूप मोठा चाहतावर्गही आहे. अशातच अभिनेत्याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने तो स्वत:चा मोठा क्रिटिक असल्याचं म्हटलं आहे. आदित्यने केलेल्या कामासाठी तो समाधानी नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.

आदित्यने ‘आयएएनएस’शी (IANS) संवाद साधताना त्याच्या कामाबद्दल सांगितलं आहे. आदित्यला तू तुझ्या कामावर टीका करतो का? तू केलेल्या कामाबद्दल तुला काय वाटतं, याबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर आदित्य म्हणाला, “हो, मी स्वत:चा खूप मोठा क्रिटिक आहे. मी कधीच आनंदी नसतो, कधीच समाधानी नसतो, मला नेहमी असंच वाटतं की मी अजून चांगलं काम करू शकलो असतो. करिअरच्या सुरुवातीला मी काम झाल्यानंतर घरी जाऊन बराच वेळ विचार करायचो की मी अजून चांगलं काम करू शकलो असतो. पण, वेळेनुसार माझ्यामध्ये बदल होत गेले आणि मला कायम माझ्या कामाबद्दल असंच वाटत राहणार आहे किंवा आपल्याला आपण केलेल्या कामाबद्दल असंच वाटतं हे मला आता पटलं आहे.”

आदित्य पुढे म्हणाला, “आता दिवस संपला की मी हा विचार करत नाही. तुमचा माइंडसेट महत्त्वाचा असतो, कारण केलेल्या कामाबद्दल सारखा विचार करून काहीच हाती लागत नाही. पण हो, मी स्वत:चा खूप मोठा टीकाकार आहे. मी सीन झाल्यानंतर तो कसा झाला आहे हे तोवर बघत नाही, जोपर्यंत मला खात्री नसते की मी तो सीन अपेक्षित होता तसाच केला आहे. मी तेच करतो, जे माझ्या आणि दिग्दर्शकाच्या दृष्टीने योग्य असतं.” आदित्य पुढे म्हणाला, “स्वत:च्या कामावर टीका करणं, आपण केलेल्या कामात कुठे चुकलो हे पाहणं गरजेचं असतं असं मला वाटतं. पण, आता मी हळू हळू माझ्या कामावर उगाच फार टीका न करता चुकलं असेल तर मान्य करून सोडून दतो आणि पुढे जातो; कारण जर दिग्दर्शक माझ्या कामामुळे आनंदी असेल तर मग मीच स्वत:वर टीका करण्यात काहीच अर्थ नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्यने यावेळी दिग्दर्शक व कलाकार यांच्यामध्ये चांगले संबंध असणं, त्यांनी एकमेकांसह चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी अनेक विषयांवर त्यांची मतं माडंली, संवाद साधला तर पुढे काम करायला सोप जातं,असं म्हटलं आहे. तुम्ही करत असलेल्या चित्रपटाबद्दल तुमची काय मतं आहेत हे जाणून घेणं आणि तुमचे विचार जुळणं म्हत्त्वाचं आहे. कारण जर कलाकार आणि दिग्दर्शकामध्ये वैचारिक मतभेद असतील तर मग काम करणं कठीण होतं. दरम्यान, आदित्य लवकरच ‘मेट्रो इन दिनो’ या त्याच्या आगामी चित्रपटामधून झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासह सारा अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.