‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटाप्रमाणेच प्राइम व्हिडिओच्या ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या सीरिजच्या दोनही सीझनप्रमाणे येणारा नवा सीझनही लोकांचं लक्ष वेधून घेतलं होता. यातील अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने नुकत्याच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
२०१० साली ‘खिचडी’ या चित्रपटातून कीर्तीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. २०१९ साली ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजचा पहिला सीजन आला होता. ही वेबसीरिज करताना कोणता विचार डोक्यात होता याबद्दल बोलताना ती म्हणाली “माझ्यामते मी एक गंभीर अभिनेत्री आहे. जर माझी भूमिका माझ्याकडून काही अपेक्षा करत असेल तर नक्कीच मी स्वतःला झोकून देते. माझे २०१६ साली लग्न झाले होते. त्यावेळी माझ्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याने मला पाठिंबा दिला होता. तो अजिबात माझ्या बाबतीत असुरक्षित नव्हता. पडद्यावर किसिंग सीन, इंटिमेट सीन करण्यासाठी त्याने कधीच हरकत घेतली नाही. आमच्या क्षेत्रात हे फार दुर्मिळच, मला हे प्रतिगामी वाटते. त्याने मला खरोखरच तो आत्मविश्वास आणि पाठिंबा दिला, मला पात्रासाठी आवश्यक ते काम करायला तयार होते. काही इतरांपेक्षा जास्त घाबरले होते. काहींना फरक पडला नाही. या चारही मुलींच्या सेक्स सीन्सकडे पाहण्याची पद्धत खूप वेगळी होती. मला ते सोयीस्कर पडले. एक अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी हा सशक्त क्षण होता.” तिने वेबसीरिजबद्दल माहिती दिली आहे
विश्लेषण : मिलते है ब्रेक के बाद! आमिर खानमुळे चर्चेत आलेला ‘हायट्स’ ट्रेंड नेमका आहे तरी काय?
२०१० साली ‘खिचडी’ या चित्रपटातून कीर्तीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘पिंक’, ‘उरी’, ‘मिशन मंगल’ आणि ‘लेटेस्ट द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. तिने आपले लग्नाच्याबाबतीत गुप्तता पाळली होती. दरम्यान साहिल सेहगल, कीर्ती या दोघांची भेट एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. त्यानंतर प्रेम जमले आणि दोघे विवाहबंधनात अडकले. मात्र हे लग्न फारकाळ टिकले नाही, या दोघांनी २०२१ साली वेगळं होण्याचं निर्णय घेतला.
जोयीता पटपटिया यांचे दिग्दर्शन, देविका भगत यांचे लेखन आणि इशिता मोईत्रा यांचे संवाद असलेली ही बहुप्रतिक्षित अॅमेझॉन ओरिजिनल सीरिज दुसऱ्या सीझनमध्ये ज्या नाट्यमय वळणावर थांबली होती, तिथूनच या पुढील सीझनची सुरुवात झाली आहे. तिसऱ्या सीझनमध्ये या चारही अभिनेत्रींच्या बरोबरीने प्रतीक बब्बर, लिसा रे, नील भूपालन, राजीव सिद्धार्थ , अम्रिता पुरी, सिमोन सिंग आणि समीर कोचर त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांमध्ये आहेत.