दिवाळीचा पहिला दिवस जरी उद्या असला तरी देशात आजच दिवाळी साजरी केली जात आहे. कारण भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला आहे. सध्या चर्चा आहे ती टी २० टी२० विश्वचषक स्पर्धेची, आज भारत आणि पाकिस्तानमध्ये मेलबर्न येथे सामना रंगला होता. हा सामना पाकिस्तान जिंकणार अशी दाट शक्यता असताना. विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीने हा सामना आपण जिंकू शकलो. सध्या विराटाचे सगळे जण कौतुक करत आहेत.

देशात विराटाचे लाखो चाहते आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये ही त्याचे चाहते आहेत. अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तरने विराटाचे कौतूक केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विराटचा फोटो शेअर करत लिहलं आहे ‘बॉस,विराट कोहली तू खरं सौंदर्य आहेस’, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फरहान अख्तरप्रमाणे इतर बॉलिवूड सेलिब्रेटी त्याचे कौतूक करत आहेत. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८३ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

IND vs PAK T20 World Cup 2022 : भारताच्या ‘या’ अभूतपूर्व विजयावर प्रवीण तरडे म्हणाले, “दिवाळी आपल्याला… “

सामन्याची नाणेफेक फेकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ८२ धावा केल्या. त्यापाठोपाठ हार्दिक पांड्याने देखील ३७ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. इतर भारतीय फलंदाजांना १६ धावांचा टप्पा करता आला नाही. पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना हरीस रौफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.