Why Indian Actors Dont Speak Up Against Government: बॉलीवूडमध्ये सलीम-जावेद ही जोडी लोकप्रिय ठरली. त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. बॉलीवूडमध्ये अँग्री यंग मॅन ही संकल्पना रुजवण्यात सलीम-जावेद या जोडीचे मोठे योगदान आहे.

जावेद अख्तर हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी भारतातील कलाकार सरकारविरूद्ध का बोलत नाहीत? यावर वक्तव्य केले.

जावेद अख्तर यांनी नुकतीच कपिल सिब्बल यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत कपिल सिब्बल म्हणाले की मी विचार करतो की भारतात आज अशी स्थिती आहे की महागाई वाढल्याबाबत, पगार न वाढल्याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्याचा प्रभाव बॉलीवूडवर पडायला पाहिजे. मात्र, सामान्य नागरिक असा विचार करत असतील तर त्याचं प्रतिबिंब बॉलीवूडमध्ये पडलेलं का दिसत नाही?

या समस्या चित्रपटसृष्टीच्या…

कपिल सिब्बल यांच्या या प्रश्नावर यावर जावेद अख्तर म्हणाले की आता मल्टिफ्लेक्स झाले आहेत. मल्टिफ्लेक्समध्ये समोसासुद्धा २०० रुपयांचा मिळतो. तिकीट ५००-६०० रुपयांचं असतं. म्हणजे, ४ सदस्य असलेलं जर एखादं कुटुंब चित्रपट पाहण्यासाठी जात असेल तर तीन ते साडेतीन हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे हे चित्रपट श्रीमंत लोकच पाहतात. जर चित्रपटच श्रीमंत लोक पाहत असतील चित्रपटाची गोष्ट गरीब लोकांची का असेल?”, असे म्हणत आजच्या सामान्य नागरिकांचे प्रश्न चित्रपटात प्रतिबिंबित का होत नाहीत, यावर जावेद अख्तर यांनी वक्तव्य केले.

पुढे कपिल सिब्बल यांनी विचारले की एखादा कलाकार या मुद्द्यांवर बोलताना दिसत नाही. जसं मेरिल स्ट्रीपने तिथल्या सरकारविरुद्ध आवाज उठवला होता. पण, भारतातले कलाकार असे करताना दिसत नाहीत, शांत राहतात. आधी व्हायचे, आता होत नाही, असे का? यावर जावेद अख्तर म्हणाले, “चित्रपटसृष्टीतील लोकांचे नावं गाजलेली आहेत. पण, त्यांची आर्थिक स्थिती फार उत्तम नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टीला एक मध्यमवर्गीय उद्योगपती खिशात ठेऊ शकतो. जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याजवळ पैसे आहेत. त्यांच्यापैकी कोण बोलतं? कोण आवाज उठवतं?”

यावर कपिल सिब्बल म्हणाले की त्यांच्याकडे ईडीचे छापे पडतील, असा तुमचा दृष्टीकोण आहे का? यावर जावेद अख्तर म्हणाले की असंच काहीसं मी याकडे पाहतो. मेरिल स्ट्रीपने (अमेरिकन सरकारविरुद्ध) एक विधान केले होते. पण त्यामुळे तिच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला नाही. आता ही केलेल्या विधानामुळे आयकर विभागाचे छापे पडतील ही असुरक्षितता भारतात खरंच आहे की नाही, या वादात मला पडायचं नाही.

पुढे जावेद अख्तर म्हणाले की जर हा दृष्टीकोण असेल की केलेल्या विधानामुळे की ईडी,सीबीआय, इनकम टॅक्सचा छापा पडू शकतो, चौकशी होऊ शकते, तर एखाद्याला भीती वाटू शकते. या सगळ्या समस्या आहेत. या समस्या चित्रपटसृष्टीच्या नाहीत. चित्रपटसृष्टीच्या बाहेरच्या समस्या आहेत. आता चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसुद्धा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसारखेच आहेत. इतर सामान्य लोकांप्रमाणेच ते काम करतात. या क्षेत्रात फक्त जास्त गाजावाजा असतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली पाहिजे, असे वक्तव्य केले होते.