‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘द केरला स्टोरी’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. अवघ्या १८ दिवसांमध्ये या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला, परंतु दुसरीकडे या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक विरोधी पक्षांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म असे म्हटले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तमिळ सुपरस्टार कमल हासन यांनीही या चित्रपटाला लक्ष्य करत आपले रोखठोक मत मांडले आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जानकी’च्या भूमिकेबद्दल अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “कारकिर्दीत सहसा…”

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणाले की, “मी तुम्हाला सांगितले होते हा प्रोपगंडा चित्रपट आहे आणि मी याच्या विरोधात आहे. केवळ चित्रपटाच्या लोगोवर किंवा पोस्टरच्या खाली सत्यघटनेवर आधारित असे लिहून उपयोग नाही. संबंधित घटना प्रत्यक्षात सुद्धा खरी असावी लागते.” अभिनयासोबत कमल हासन राजकारणातही सक्रिय असतात. गेल्यावर्षी त्यांचा लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘विक्रम’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.

हेही वाचा : Video : विराटची बुद्धिमत्ता पाहून अनुष्का झाली थक्क! पत्नीला बिझनेसची ऑफर देत कोहली म्हणाला, “कभी धोखा नहीं दूंगा…”

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत “संवेदनशील विषयांवर चित्रपट बनले पाहिजेत, पण ते संवेदनशील पद्धतीने बनवले पाहिजेत. निवडणुकांच्या काळात धर्मांतरावर आधारित चित्रपट का आला? अशा पद्धतीने निवडणुकांच्या काळात चित्रपट रिलीज करणे ही वेळ संशयास्पद वाटते.” असे रोखठोक मत मांडले होते.

हेही वाचा : वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यामुळे अनेक भागांत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, तर याउलट काही भागांत हा चित्रपट टॅक्स-फ्री करण्यात आला होता. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ मे रोजी बंदी घातली होती. यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अनुराग कश्यप, अभिनेत्री कंगना रणौतने या चित्रपटाचे समर्थन केले होते, तर काहींनी विरोध दर्शवला होता.