चार वर्षं उलटून गेली तरी अजूनही सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल चर्चा होताना दिसत आहे. त्याचे चाहते अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. सुशांतच्या मृत्यूमागचं गूढ हे अजूनही कायम आहे. पोलिसांनी जरी त्याची केस बंद केली असली तरी याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गॉडफादरशिवाय केवळ स्वतःच्या मेहनतीवर सुशांतने चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

सुशांतच्या याच स्ट्रगलबद्दल नुकतंच अभिनेता विवेक ओबेरॉयने भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी विवेक स्वतः तिथे उपस्थित होता. त्यावेळी सुशांतच्या वडिलांना पाहून त्याला काय भावना मनात दाटल्या याबद्दल विवेकने खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या अडचणीच्या काळात आपणही सुशांतसारखं पाऊल उचलणार होतो हेदेखील विवेकने स्पष्ट केलं.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

आणखी वाचा : ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना विवेक म्हणाला, “मी सुशांतला भेटलो आहे, त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या आहेत. तो फारच चांगला, प्रेमळ मुलगा आणि एक उत्कृष्ट कलाकार होता. तो ज्या पद्धतीने आपल्याला सोडून गेलाय तए फारच दुःखद आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्याही आयुष्यात एक असा खडतर काळ होता. त्या काळात माझ्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू होती. सुशांतने जे पाऊल उचललं, मीसुद्धा तेव्हा तसंच काहीसं पाऊल उचलायचा विचार करत होतो.”

पुढे विवेक म्हणाला, “सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोक होती. त्यादिवशी भर पावसात मी सुशांतच्या वडिलांच्या डोळ्यातील वेदना, दुःख पाहिल्या अन् त्यावेळी विचार आला की जर सुशांतने ते दृश्य पाहिलं असतं, त्याच्या जवळच्या लोकांची अवस्था पाहिली असती तर त्याने तो निर्णय कधीच घेतला नसता. त्यावेळी एक गोष्ट मला समजली की तुमच्या जवळच्या लोकांना ज्यांच्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करता त्यांची अशाप्रसंगी काय अवस्था होईल, त्यांना किती दुःख होईल, यातना होतील? याचा विचार आपण करायला हवा.”

या सगळ्यातून बाहेर पडण्याबद्दल विवेक म्हणाला, “मी स्वतःला खूप नशीबवान समजतो माझ्याकडे एक असं घर आहे, एक कुटुंब आहे जे आम्हाला एकत्र बांधून ठेवतं. त्यावेळी मी एका लहान मुलासारखा खाली जमिनीवर बसलो, माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि अक्षरशः खूप रडलो आणि मोकळा झालो.” या सगळ्यावर मात करत विवेकने दमदार कमबॅकही केलं. ‘इनसाइड एज’, ‘धारावी बँक’सारख्या वेबसीरिजमधून विवेकने ओटीटीमध्ये पदार्पण केलं. नुकताच विवेक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सीरिजमध्येही झळकला.