शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांनी अभिनेते किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करावा असं म्हटलं आहे. मुलगी झाली हो मालिकेमधून किरण माने यांना राजकीय भूमिकेमुळे काढण्यात आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मागील बऱ्याच दिवसांपासून मानेंच्या मालिका गच्छंतीचे प्रकरण चर्चेत असताना यावरुन मोठा राजकीय वादही निर्माण झालाय. याच संदर्भात रोकठोक मत व्यक्त करताना दीपाली भोसले सय्यद यांनी मानेंना राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिलाय.

“या वादाच्या आधी किरण माने कोण आहेत, कोणत्या मालिकेत काम करतात, हेही मला माहीत नव्हते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, हे ही मला माहीत नव्हते. त्यावेळी मी पाठिंबा दिला होता पण नंतर अशा गोष्टी सुरू झाल्या की ज्यामध्ये त्यांनी, मालिकेच्या मंचावर चांगले काम न करणे, महिलांशी त्याची वागणूक चांगली नव्हती यासारख्या आरोपांचा समावेश होता. कोणतीही व्यक्ती कोणतेही विधान जारी करू शकतो, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत आपलं मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे,” असं दीपाली भोसले सय्यद म्हणाल्या.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

“मत मांडण्यासाठी त्यांना कामावरून काढून टाकणे आणि त्यांच्याबद्दल अफवा पसरवणे पूर्णपणे चुकीचे आहे. किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. त्यांना मुद्दे मांडण्याची कला येत, त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे मला वाटते,” असंही दीपाली यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसने या किरण माने यांना या प्रकरणामध्ये पाठिंबा दिला होता. तर शिवसेना, मनसे आणि भाजपाने किरण मानेंच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली होती.