ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांना ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाते. दिलीप कुमार आणि शिवसेना अध्यक्ष बाळ ठाकरे यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, एका कारणामुळे त्यांची मैत्री तुटली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब ठाकरेंनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. “आम्ही एकत्र जुन्या ‘मातोश्री’च्या गच्चीत बसायचो. महिलांना बारस्याच्या वेळी मिळातातना त्या घुगऱ्या त्या मा तळायची त्यात ती खोबर आणि कोथिंबीर घालायची. मी त्यावेळी बियर पित होतो आणि मी गच्चीत बसायचो. दिलीप कुमारचा फोन यायचा बाळु साहेब काय करत आहात? मी म्हटलं की बियर पितोय. तर दिलीप कुमार म्हणाला येऊ का? मी म्हटलं ये आणि आम्ही दोघं गच्चीत बसायचो. त्याला ते चने भयंकर आवडले. त्यानंतर तो फोन करून विचारयचा की चने खायला येऊ का? मी म्हणायचो ये अशी आमची मैत्री होती,” असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumar bal thackeray were best friends but because of this reason there was a rift in their friendship dcp
First published on: 07-07-2021 at 13:21 IST