बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयामुळे सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. आज ती आपल्यात नाही. परंतु तिच्या चित्रपटांमुळे ती कायम आपल्यात असल्याचा भास होतो. हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्याची जागा आज कलाविश्वात कोणीच घेऊ शकत नाही, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज दिव्या भारतीचा ४८ वा वाढदिवस. दिव्याने फार कमी वयात असताना जगाचा निरोप घेतला मात्र चित्रपटसृष्टीत तिने तिच्या नावाचा चांगलाच दबदबा निर्माण केला

दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. त्यांनी हिंदीसोबत तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले. अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची.

वयाच्या १४ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दिव्याला सुरुवातीच्या काळापासूनच अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. दिव्याने आपल्या चित्रपटात काम करावं अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा होती. त्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी तिच्या आई-वडिलांना गळही घातली होती. मात्र दिव्याने वयाच्या १६ व्या वर्षी खऱ्या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केलं. केवळ अभिनयच नव्हे तर तिच्या सौंदर्यावरही अनेक जण भाळले होते. त्यामुळे त्याकाळी बऱ्याच निर्मात्यांनी दिव्याला आधीच चित्रपटासाठी साइन करून घेत होते.

दिव्या भारती ही ‘गुनाहों का देवता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. १९८८ मध्ये चित्रपट निर्माते नंदू तोलानी यांनी या चित्रपटासाठी तिला साइन केले होते. पण काही कारणांमुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिने तिला रिप्लेस केले. त्यानंतर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून दिव्या भारतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर तिचे अनेक अपूर्ण चित्रपट इतर अभिनेत्रींनी पूर्ण केले. ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांनी सुरुवातीला मुख्य अभिनेत्री म्हणून दिव्याला चित्रपटात घेतले होते. तिने या चित्रपटातील काही दृश्यंही चित्रीत केली होती. पण, त्याच दरम्यान आलेल्या दिव्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.

“…पण आता दारुची सर्व दुकानं उघडली आहेत”, कपिल शर्माच्या वादग्रस्त ट्वीटची शिल्पा शेट्टीने उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव रायचा ‘मोहरा’ शेवटी अर्ध्यावरच लटकला. त्यानंतर नव्या हिरोईनचा शोध घेत असताना राजीव रायने रविना टंडनला चित्रपटात घेतले. १९९४ मध्ये ‘मोहरा’ प्रदर्शित झाला आणि त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तो दुसरा चित्रपट होता. तिचा ‘दिलवाले’ चित्रपट हिट झाला होता.