बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगनाचा नुकताच ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होताच तोंडावर पडला. चौथ्याच दिवशी या चित्रपटाची देशभरात फक्त २० तिकिट विकली गेली. हे पाहिल्यानंतर चित्रपटगृहांनी ‘धाकड’चे शो रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

‘धाकड’ या चित्रपटाच्या निर्मितीला ८० ते ९० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, धाकडने आता पर्यंत फक्त ३ कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे चित्रपट OTT वर प्रदर्शित होण्यासाठीही संघर्ष करत आहे. या शिवाय चित्रपटाच्या तिकिटांची विक्री होत नसल्याचे पाहता चित्रपटगृहांनी ‘धाकड’चे शो रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

रजनीश घई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. ‘धाकड’मध्ये अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘धाकड’ला आतापर्यंत संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.