अभिनेत्री क्षिती जोग व अभिनेता हेमंत ढोमे ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, त्यामुळे दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. या जोडीने २०१२ साली लग्न केलं होतं. आता या दोघांच्या लग्नाला जवळपास १२-१३ वर्ष झाली आहेत. पण, आजही या दोघांचं नातं तितकंच घट्ट असल्याचं दिसतं. अशातच काही दिवसांपूर्वी हेमंत व क्षितीने ‘सुलेखा तळवलकर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नादरम्यानचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.

हेमंतने या मुलाखतीमध्ये क्षितीचे वडील अनंत जोग यांचा एक विनोदी किस्सा सांगितला आहे. हेमंत म्हणाला की, “जेव्हा क्षिती व मी लग्न करणार होतो तेव्हा तिच्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, बाप म्हणून मी तुला सांगतो, पुढची जबाबदारी सगळी तुझी. जे काय भोगायचं आहे ते तुला भोगायचं आहे. आमच्याकडे येऊन परत असं बोलायचं नाही की, तुमची मुलगी अशी आहे किंवा मला हे सांगितलं नव्हतं, ते सांगितलं नव्हतं; असं म्हणालास तर मला ते चालणार नाही. लग्न टिकवलंस तर मी भारतरत्न देईन, टिकवलं नाहीस तर मला काही घेणं देणं नाही.”

हेमंत व क्षिती पहिल्यांदा २०११ साली भेटले होते, त्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि भेटल्यानंतरच्या एक दीड वर्षातच दोघांनी लग्न केलं. हेमंत व क्षितीने डिसेंबर २०१२ साली एकमेकांसह लग्न केलं; तर क्षिती व हेमंत यांची स्वत:ची निर्मिती संस्थासुद्धा आहे. या मार्फत ते त्यांच्या चित्रपटांची निर्मिती करत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हेमंतने त्याच्या करिअरची सुरुवात २०१० साली आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात काम करत केली होती. यामध्ये हेमंतने अभिनेते भरत जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांसारख्या कलाकारांबरोबर काम केलं होतं. तर आता हेमंत अभिनयासह दिग्दर्शनातही सक्रिय असतो. त्याने ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘सन्नी’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारख्या काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे, तर क्षितीनेही आजवर अनेक मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’ यांसारख्या मालिकांमध्ये; तर ‘सन्नी’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ती ‘मिसमॅच्ड’ या सीरिजमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सध्या क्षिती ‘ठरलं तर मग’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.