ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या नवीन मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नाना यांचा ओले आले नावाचा सिनेमा ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते मकरंद अनासपुरे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

नितीन गडकरींचं भाषण आपण शांतपणे ऐकत असल्याचं नाना म्हणाले. “गडकरी बोलू लागले की मी शांतपणे ऐकत बसतो. प्रत्येक गोष्ट ते किती छान पटवून देतात. सगळी आकडेवारी नीट सांगतात. काहीवेळी त्यांची टिंगल होते की इतकी आकडेवारी वगैरे. ते सगळं सोडून द्या. पण नितीन गडकरी राजकारणातले अजातशत्रू आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांमधील आवडती व्यक्ती नितीन गडकरी आहेत,” असं नाना पाटेकर ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो…”

नितीन गडकरींनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. “फडणवीस बोलायला लागल्यानंतर त्यांचं बोलणं मुद्देसूद होतं, अघळपघळ पसारा नसतो. मला ते ऐकायला छान वाटतं. मला वाटतं की मी काहीतरी त्याच्याबद्दल बोलू शकतो, माझं मत मांडू शकतो. राजकारणात सातत्य असलेली मंडळी आता कमी व्हायला लागली आहे,” असं नाना पाटेकर देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाले.

“अन् मातोश्रीशी संबंध संपला…”, नाना पाटेकरांनी सांगितली जुनी आठवण; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीत नाना पाटेकरांनी आपल्याला राजकारण कळत नाही, असं विधान केलं. तसेच राजकारणाबाबत कोणतंही भाकित करता येत नसल्याचंही ते म्हणाले.