‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्यने नवरात्री उत्सवासाठी त्याचं एक खास गाणं रिलीज केलंय. राहुल सोबतच गायिका भूमि त्रिवेदीने हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याच्या व्हिडीओत राहुल आणि निया शर्मा झळकले आहेत. मात्र गाणं रिलीज होताच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यामुळे राहुलला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.

राहुलच्या ‘गरबे की रात’ या गाण्यामध्ये ‘श्री मोगल माँ’ यांचा उल्लेख आहे. गुजरातमध्ये मोगल माँ यांचे अनेक भक्त आहेत. या गाण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. या गाण्यातून देवी चा उल्लेख काढून टाकण्यासाठी राहुलला अनेक कॉल आणि मेसेज येत असल्याचं राहुलच्या टीमकडून सांगण्यात आलंय. ई-टाइम्सशी संवाद साधताना राहुल वैद्यचे प्रवक्ता म्हणाले, “होय मेसेज आणि कॉल्सचं प्रमाण काल रात्रीपासून वाढू लागलं आहे. यात त्याला जीवी मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं बोललं जात आहे.”

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

तारक मेहता…’मधील टप्पूने सोनूच्या फोटोवर केली ‘ही’ कमेंट, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान या गाण्यात मोगल माँ यांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करण्यात आला असून कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचं राहुलचे प्रवक्ता म्हणाले आहेत. “जर या गाण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान करून हे सर्व ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला हे ठीक करण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी या सर्वांना विनंती आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही गाणं लॉन्च केलंय त्यात बदल करण्यासाठी थोडा वेळ लागेल.” असं राहुलचे प्रवक्ता म्हणाले.

‘गरबे की रात’ या गाण्यात राहुल वैद्य आणि निया शर्मा पहिल्यांदा एकत्र झळकले आहेत. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर गाणं चांगलंच व्हायरल झालं असून अनेक नेटकऱ्यांनी रील्स बनवण्यासाठी या गाण्याची निवड केल्याचं पाहायला मिळतंय.