हिंदी चित्रपटसृष्टीला यशा-पयशाची कारणे शोधायला फारसे आवडत नाही. त्यांचे सगळे लक्ष्य गल्ला पेटीवर चित्रपटाची कमाई किती झाली यावर. आपण मात्र एखाद्या चित्रपटाच्या अपयशाची कारणे शोधण्याचा छोटासा प्रयत्न करुया. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा या चित्रपटाच्या अपयशाची काय कारणे असावीत?
१) अंडरवर्ल्डवरील चित्रपटाबाबतचे नाविन्य संपुष्टात आले आहे.
२) अंडरवर्ल्डचा डॉन (यामध्ये अक्षयकुमार) आपल्याला आवडलेल्या युवतीला प्रेमाने जिंकण्यात आपला किंमती वेळ वाया घालवणे शक्यच नाही. तो तिला (यामध्ये सोनाक्षी सिन्हाला) उचलून नेईल, पळवेल किंवा धमकावेल. यातला डॉन असे काहीही न करता नरमतो म्हणजे काय?
३) डॉनला त्याचे खबरी आणि पंटर प्रत्येक गोष्ट सांगत असतात. डॉनच्या प्रेयसीला दुसरा गॅंगस्टर (यामध्ये इम्रान खान) भेटतोय हे ते कसे सांगत नाहीत?
४) निर्दयी डॉन एखाद्या युवतीच्या सहवासाने सहजी विरघळेलच कसा?
अशा प्रश्नाच्या जंजाळात पडण्यापेक्षा चित्रपट पडला हे मान्य करून पुढील शुक्रवारकडे लक्ष्य देवूया का? कारण चित्रपट का चालला, कसा पडला याचा विचार करतोय कोण?