मालिकेमध्ये पुढे काय होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना नेहमीच असते. कोण कोणाचा बदला घेतो, नायिकेच्या आयुष्यात काय घडतंय, खलनायिका काय नवे ट्विस्ट आणते आहे. या बद्दलचे सगळे अपडेट्स दर्शकांना हवे असतात. स्टार प्रवाहवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेने खूप कमी काळातच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत असून यात बरेच रोमांचक ट्विस्ट येत आहेत. मालिकेची गोष्ट सध्या अभिषेक आणि अंकिताच्या लग्नाच्या वैवाहिक जीवनाच्या अवतीभवती फिरताना दिसत आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत आपण पाहिले की देशमुख कुटुंबीय मुंबईत परत आले आहेत. अंकिताने अभिषेकला फसवून लग्न केले आहे असा त्याला संशय येत आहे. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्याच नसून अभिशी लग्न करण्यासाठी तीने हा कट रचला होता.

मालिकेमध्ये लवकरच शेखरच्या मदतीने अभिषेक आणि यश अंकिताचा पर्दाफाश करताना प्रेक्षकांना पहायला मिळेल. पुढे यश आणि अभिषेक कांचनच्या मदतीने एक प्लान आखतात. ज्यात अंकिताला फसवण्यासाठी कांचनपण झोपेच्या गोळ्या घेण्याचे नाटक करते. या सगळ्यात अंकिताच्या तोंडातून सत्य बाहेर पडते. अभिषेकने अंकिताला कानशिलात लगावली आणि तिच्यावर फसवण्याचा आरोप केला. पुढे अंकिताची आई सगळ्याना हे ही सांगते की अंकित्ताला अभिशी लग्न करून देण्यात अनिरुद्धचा हात होता.

आता पुढे काय होणार? अभिषेक अंकिताला सोडणार का? काशी सावरणार अरुंधती ? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना बघायला मिळेल.