‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. मालिकेत ‘तारक मेहता’ हे पात्र ते साकारत होते. आता मालिकेत त्यांची जागा लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ घेणार आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सचिन श्रॉफ मालिकेत ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेतील दोन भागांचे चित्रीकरणही त्याने केलं असल्याची माहिती आहे. सचिन श्रॉफने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. याआधी तो स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ मालिकेत दिसला होता. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘आश्रम ३’मधील त्याने साकारलेली हुकूम सिंह ही राजकीय नेत्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो येत आहे. (हेही वाचा >> Brahmastra Box Office Collection day 3 : ‘ब्रह्मास्त्र’ने जमवला १२५ कोटींचा गल्ला; रणबीर कपूरसाठी ठरला बिग ओपनर)

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

हेही वाचा >> ऋता दुर्गुळेच्या वाढदिवसानिमित्त रवी जाधव यांची खास पोस्ट, म्हणाले “हेल्मेट घाल आणि…”

शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्यामागचं कारण

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील शैलेश लोढा यांनी साकारलेल्या तारक मेहता या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. परंतु, मालिकेबरोबर केलेल्या करारामुळे ते नाखुश होते. तसेच, त्यांनी दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्यांनी हा शो सोडला असल्याचं वृत्त होतं. याशिवाय मालिकेमुळे त्यांना अनेक प्रकल्प गमवावे लागले होते. त्यामुळे १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.