स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. सोशल मीडियावरही ते कायमच सक्रिय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रावर नवीन पोस्ट शेअऱ केली आहे. ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा- Video : “मोठी बहीण खरंतर आईच असते…”, तितिक्षा तावडेची बहीण खुशबूसाठी खास कविता, ऐकताच डोळ्यात येईल पाणी!

मिलिंद गवळी सोशल मीडियाद्वारे आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. आपल्या नव्या पोस्टमधून मिलिंद गवळी यांनी आयुष्यातील आनंदाची व्याख्या सांगितली आहे. एवढंच नाही तर मिलिंद यांनी त्यांच्या वडिलांच्या स्वभावाबाबतही खुलासा केला आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“आनंद”

प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात,

काही ना खाण्यापिण्यामध्ये खूप आनंद मिळतो.

माझा एक मित्र आहे, खास एखाद्या हॉटेलमध्ये एखादी डिश अतिशय चांगली मिळते म्हणून खूप लांबचा प्रवास करून तिथे जाऊन तो पदार्थ खातो, काही जण असे असतात की खाण्यापेक्षा त्यांच्या खाण्यावरच्या चर्चा करायला खूप आवडतं,

काहींना तर झोपण्यामध्ये आनंद मिळतो, अगदी अभिमानाने सांगतात की “आज साडेबारा-एक वाजता उठलो आणि मग नाश्ता केला”,

काहीना मोबाईल गेम्स खेळण्यात, वाचन लिखाण सिनेमा पाहायला, काही ना प्रवास करण्यामध्ये आनंद मिळतो, काही जणांना गाण्यांमध्ये आनंद मिळतो.

काहीं ना निसर्गाच्या सानिध्यात आनंद,

माझं असं लक्षात आलं आहे की आनंद हा आपल्याच मानण्यामध्ये असतो,

माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला काही छान आनंदी माणसं भेटली होती, जी काही कारण नसलं तरी आनंदी असायची, सदैव प्रसन्न असायची, दोन पैसे कमी असतील त्यांच्याकडे पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कमी व्हायचं नाही, त्यांना भेटलं की आपोआपच आपल्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं,

माझ्या वडिलांना दुसऱ्यांना मदत करान्यात फार आनंद मिळतो, दुसऱ्याला आपली गरज आहे आणि त्यांना मदत करण्यात आनंद मिळतो आणि ते प्रसन्न होतात.

ते पोलीस खात्यात होते त्यावेळेला त्यांचा गैरफायदा घेणारे असंख्य लोक होते, आम्हाला ते जाणवायचं की हा माणूस त्यांचा गैरफायदा घेतो आहे, पण त्याचं त्यांना कधीच काही वाटलं नाही, आपल्याकडे मदत मागायला आलाय आणि आपण त्याला प्रामाणिकपणे मदत करावी एवढेच त्यांना माहीत होतं. त्यामुळे ते सतत प्रसन्न आणि आनंदी राहतात , कारण मनामध्ये काही कपटच नसतं .

प्रामाणिकपणे काम करत राहणे यात जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही असं त्यांना वाटतं,

मी कसा जरी असलो तरी माझ्या आई-वडिलांचे काही अतिशय चांगले गुण माझ्यामध्ये थोडीफार उतरलेले आहेत, कदाचित त्यामुळेच इतकी वर्ष मी या क्षेत्रामध्ये मी तरलोय .

आनंदी प्रसन्न माणसं सगळ्यांनाच आवडतात असतात, पण रागावणार्या माणसां पासून लोक थांब पळत असतात,

रागावणं चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला असं वाटतं त्याने आपल्या च शरीरामध्ये बिघाड होतो, त्यांचं स्वतःचं शरीराचे इंजिन तापल्यामुळे लवकर बंद पडायची शक्यता असते, याउलट आनंदी माणूस खूप निरोगी आणि energetic आयुष्य जगतो.

मला फोटो काढायला आणि काढून घ्येण्यात आनंद मिळतो.

“आई कुठे काय करते”

सेट वर photographer

प्राजक्ता भावसार ने हा फोटो काढला आहे.

खूप खूप धन्यवाद प्राजक्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.