मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील. काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२१ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, लग्नाच्या एक दिवस अगोदर आस्ताद आणि स्वप्नालीत कडाक्याच भांडण झालं होतं. एका मुलाखतीत आस्ताद आणि स्वप्नालीने तो किस्सा सांगितला आहे.
आस्ताद आणि स्वप्नालीने नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत दोघांनी आपल्या करिअरबरोबरच वयक्तिक आय़ुष्यातील घडामोडींचाही खुलासा केला आहे. आस्ताद-स्वप्नालीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी झाला होता मोठा राडा झाला होता. स्वप्नाली म्हणाली, त्या दिवशी आस्ताद माझ्या घरी आला होता. मी त्याच्यासाठी जेवणही बनवलं होतं. आमचं बोलण सुरु होतं. बोलता बोलता आमच्यात वाद सुरु झाले आणि मी रागाने घर सोडून गेले. रात्रीचे १ वाजले होते. आस्तादने माझ्या बहिणीला फोन लावला. ती युएसला असते. तिने शालमलीला फोन केला. शालमलिचा मला फोन आला तिने मला तिच्या घरी बोलवून घेतलं.
स्वप्नाली पुढे म्हणाली “मला आस्तादचा खूप राग आला होता. मी त्याच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मी आस्तादच्या वागण्याला कंटाळले होते. त्यावेळी आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. दुसऱ्या दिवशी मी माझे सगळे कपडे घेऊन निघून गेले. काही दिवसानंतर सगळं निवळलं. आस्तादने माझी माफीही मागितली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना अजून एक संधी देण्याचं ठरवलं.”
आस्ताद आणि स्वप्नालीची पुढचं पाऊल मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये प्रचंड भांडण व्हायची पण हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मराठी बिग बॉसमधून आस्ताद काळे आणि स्वपनालीची लव्हस्टोरी समोर आली होती. बिग बॉसमध्ये आस्दाने स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. तसेच सप्टेंबर २०२१ साली दोघांनी रजिस्टर लग्न केलं. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आस्ताद आणि स्वप्नाली सध्या ‘जाऊ नको दूर बाबा’ मालिकेत झळकत आहेत.