‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या मालिकेच्या निमित्ताने अनेक नवोदित कलाकार घराघरांत पोहोचले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे अभिनेता सुव्रत जोशीला एक वेगळी ओळख मिळाली त्याने यामध्ये ‘सुजय’ची भूमिका साकारली होती. अलीकडेच या मालिकेच्या संपूर्ण टीमने केक्राफ्ट या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या वेळी सुव्रतने सेटवर घडलेले अनेक किस्से सांगितले.

हेही वाचा : “…अशा करिअरचा काय उपयोग?”, नेटकऱ्याच्या प्रश्नाला क्रांती रेडकरने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “माणसाचं नातं…”

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवरील किस्से सांगताना सुव्रत म्हणाला, “पडद्यामागे आमची एकमेकांशी प्रचंड भांडणं व्हायची. मालिकेत तुम्ही अनेकदा आधी भांडणं त्यानंतर मिलाप झाला अशा घटना पाहिल्या असतील… अगदी त्याचप्रमाणे ऑफस्क्रीन सुद्धा आमच्यात भांडणं झाली होती…दोन गट निर्माण झाले होते पण, जसं ‘दिल दोस्ती…’ मध्ये त्या पात्रांना माजघर बांधून ठेवायचं तसंच आमचा सेट, तिकडचे लोक आम्हाला एकत्र आणायचे.”

हेही वाचा : “एक नवी सुरुवात…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री लवकरच हिंदी मालिकेत झळकणार, शेअर केला प्रोमो

“आमच्या ग्रुपमध्ये प्रचंड स्पर्धा होती…अत्यंत चांगली आणि जीवघेणी स्पर्धा होती. पण, भांडणं करताना केव्हाच आम्ही नकारात्मकता मनात ठेऊन भांडलो नाही. समजा एखाद्या एपिसोडमध्ये आमच्यापैकी कोणाचा एक सीन जरी कमी असेल तरी, ती व्यक्ती ग्रीनमध्ये बसून आम्हाला ‘काय मगं कशी चाललीये तुमची मालिका?’ असे टोमणे मारायची…अशी स्पर्धा आमच्यात होती.” असा किस्सा सुव्रतने सांगितला.

हेही वाचा : “पूर्वी विश्वास ठेवायचे नाही पण…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली, “बाळाचा पायगुण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका २०१५ मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित व्हायची. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा भाग ‘दिल दोस्ती दोबारा’ २०१७ मध्ये सुरु करण्यात आला होता. मालिकेच्या दोन्ही भागांमध्ये अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपूटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.