Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत जीवाने काव्याच्या नावाचा टॅटू जाळल्याचा भयंकर ट्विस्ट पाहायला मिळाला होता. टॅटू जाळताना जीवाने आपल्यातील नातं संपलं असं स्पष्टपणे काव्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे यावर आता काव्या काय निर्णय घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जीवाच्या सतत मागेपुढे करणाऱ्या काव्याने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

टॅटू जाळल्यावर जीवाची प्रकृती बिघडते आणि तो बेशुद्ध होतो. याचं सगळं खापर जीवाची आई नंदिनीवर फोडते. तिला या सगळ्या गोष्टींचा दोष दिला जातो. पण, जीवाला शुद्धा आल्यावर तो पहिल्यांदा “नंदिनी कुठेय?” असा प्रश्न आपल्या आईला विचारतो. यामुळे मानिणीला तिची चूक लक्षात येते. ती लगेच फोन करून नंदिनीला घरी बोलावून घेते. तर, दुसरीकडे काव्या सुद्धा पार्थसाठी वटपौर्णिमेची पूजा करते.

काव्या आणि जीवाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. पण, अशा काही घटना घडतात की जीवाचं लग्न नंदिनीशी आणि काव्याचं लग्न पार्थशी होतं. काव्या काही करून पार्थबरोबर संसार करायला तयार नसते. पण, जीवाने टॅटू मिटवल्यावर काव्या आता मोठा निर्णय घेणार आहे. ती सुद्धा तिच्या बाजूने हे नातं संपवणार आहे. यापुढे फक्त ताईचा नवरा म्हणून जीवाशी संबंध असेल असं ती स्पष्टपणे सांगते.

काव्या म्हणते, “जीवा तू फक्त टॅटू नाही जाळलास… तर, माझं अस्तित्व जाळून टाकलंस. म्हणूनच लग्न मोडून तुझ्याशी नाव जोडू पाहणारी ही काव्या आतापासून संपली…आजपासून तू फक्त ताईचा नवरा! प्रेम कसं असावं आणि कसं असू नये हे तू चांगलंच शिकवलंस… या शिकवणीबद्दल थँक्यू!” एवढं बोलून काव्या हात जोडून जीवासमोरून निघून जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत लवकरच हा जबरदस्त ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता काव्याने नातं संपवल्यावर जीवा काय निर्णय घेणार? त्याची प्रतिक्रिया काय असेल हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.