मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. नुकतंच प्राजक्ताने सिनेसृष्टीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे.

आज महिला दिनानिमित्ताने प्राजक्ता माळीने खास मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीत, पुरुषी अंहकार याबद्दल भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, “मी सिनेसृष्टीत नवीन होते. माझं कोणीही या सिनेसृष्टीशी निगडीत नव्हते. त्याबरोबर आम्ही पुण्याला असायचो, मग मुंबई-पुणे हा प्रवास अशा बऱ्याच गोष्टी होत्या.”
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

“मी सिनेसृष्टीत आल्यावर मला अनेकांनी विविध सल्ले दिले. त्यातील एक सल्ला म्हणजे महिलांनी दिलेले सल्ले पुरुष दिग्दर्शकांना अजिबात आवडत नाही. ते त्यांना पचवता येत नाहीत. त्यामुळे त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो.”

“अनेक सहकलाकारांच्या बाबतही मला या गोष्टी सांगण्यात आल्या. अभिनेत्रींनी फक्त सुंदर असावं पण मूर्ख असावं, असं अनेकदा सांगितले जाते. हे मराठी सिनेसृष्टीत फार कमी आहे. पण इतर सिनेसृष्टीत हा प्रकार सर्रास घडतो. चित्रपटात अभिनेत्री फक्त सुंदर दिसण्यासाठी, नाचण्यासाठी इतकीच मर्यादित असावी. पण आता चित्र बदलतंय. पण यासाठी तुम्हाला झगडावं लागतं आणि मी त्यासाठी कायमच झगडत राहिन”, असे प्राजक्ता माळी म्हणाली.

आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.