बॉलिवूडमध्ये कायमच ट्रेंडीग मध्ये असणारे कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलीयाकडे पाहिले जाते. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. रितेश आणि जिनिलीया यांच्या लग्नाला १० वर्षे उलटली आहेत. पण त्यांच्यातील प्रेम हे अद्याप कायम आहे. नुकतंच एका कार्यक्रमात रितेश जिनिलीयाच्या पाया पडला आणि त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

रितेश आणि जिनिलीया नुकतंच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. झी मराठीने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश हा त्याच्या सुखी संसाराचे गुपित सांगताना दिसत आहे. यावेळी श्रेयस तळपदे आणि रितेशची ऑनस्क्रीन सुरु असलेली मजा मस्तीही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “सुखी संसारासाठी माणसाने…” लग्नाला १० वर्षे उलटल्यानंतर रितेश देशमुखने केला खुलासा

या व्हिडीओच्या सुरुवातीला श्रेयस तळपदे हा रितेशला तुझ्या “सुखी संसाराचे रहस्य काय?” असा प्रश्न विचारतो. त्यावर रितेश हा माणसाने चूक आपलीच आहे, हे लवकर कबूल केलं पाहिजे, असे म्हणतो. रितेशचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अभिनेत्री अलका कुबल या हसताना दिसतात.

त्यानंतर रितेशचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रितेशा हा भर पुरस्कार सोहळ्यात जिनिलीयाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित सर्वजण ‘वेड’ या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. ‘रितेश देशमुख हे त्यांच्या पत्नीला घाबरतात’, असे श्रेयस यावेळी बोलतो. त्यावरही सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “माझा प्रेमावर…” ब्रेकअपनंतर प्राजक्ता माळीने पहिल्यांदा केले प्रेमाबद्दल भाष्य 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.