‘बिग बॉस’चं १७वं पर्व जोरदार सुरू आहे. या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला काही आठवडे बाकी आहेत. पण जसजसा महाअंतिम सोहळा जवळ येत आहे, तसतसा शो आणखी रंगतदार होत चालला आहे. अशातच विकेंडच्या वारला घरातून एक सदस्य बेघर झाला आहे. हा सदस्य शोमधून बाहेर पडल्यामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांना फार आनंद झाला आहे. सोशल मीडियावर या सदस्याबाबत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.

हेही वाचा – Video: भर हायवेवर उतरुन ‘या’ मराठी अभिनेत्याने वाचवला मुक्या प्राण्याचा जीव, प्रसंग सांगत म्हणाला…

Polling for the second phase of 88 seats in 13 states and central territories
लेख: दुसऱ्या टप्प्यातही कमी मतदानाची चिंता?
Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Lost intellectually-challenged boy reunited with parents via QR code on pendant
खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध

‘बिग बॉस’चा हा विकेंडच्या वार लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला. यावेळी करणने घरातीलं काही सदस्यांना खडसावलं. इशा, मुनव्वर, आयशा, विक्की यांना चांगलंच फटकारलं. यानंतर घरातून बेघर होणाऱ्या सदस्याचे नाव घोषित केलं. या आठवड्यात अरुण माशेट्टी, समर्थ जुरेल, मनारा चोप्रा, आयशा खान, विक्की जैन, अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारुकी हे सर्वजण बिग बॉसमधून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड सदस्य होते. यामधून समर्थ म्हणजेच चिंटू हा शो बाहेर झाला.

समर्थ बेघर झाल्यानंतर बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. “आतापर्यंतची सर्वात चांगली बातमी”, “आता मी खूप आनंदी आहे”, “आता इशा काय करते बघूच”, “जर इशा नसती तर समर्थ अजून चांगलं मनोरंजन करू शकला असता”, अशा अनेक प्रतिक्रिया ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांच्या सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

हेही वाचा – …झरझर मोठ्या होतात लेकी”, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत, मुलीचे फोटो शेअर म्हणाली…

दरम्यान, गेल्या आठवड्यात समर्थ व इशाचं अभिषेकबरोबर मोठं भांडणं झालं होतं. रागाच्या भरात अभिषेकने समर्थच्या कानशिलात लगावली होती. यामुळे अभिषेक शो बाहेर झाला होता. पण काही दिवसांतच अभिषेक पुन्हा शोमध्ये आला.