एक सरदारजी मनमाड स्टेशनवरून मुंबईला जाणार असतो. गाडीत खूप गर्दी असते. तो युक्ती करतो. डब्यामध्ये जाऊन 'साप. साप.' ओरडतो. सगळे प्रवासी घाबरून बाहेर पडतात. सरदारजी आत जाऊन मस्त झोपतो. सकाळी जाग येताच खिडकीतून डोकावत एका व्यक्तीला विचारतो, "कोणतं स्टेशन आहे?" ती व्यक्ती म्हणते, "हे मनमाड स्टेशन आहे. रात्री डब्यात आलेला साप सापडत नव्हता, म्हणून स्टेशन-मास्तरने डबाच काढून टाकला.