मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलबंदीबाबत केलेल्या घोषणेसंदर्भात त्यांचे अभिनंदन करतानाच सरकारच्या धोरणात पारदर्शकता नसल्याची टीका ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. टोलबंदी बाबत सरकारचा हेतू स्वच्छ असेल तर टोलनाके ‘कॅशलेस’ करून त्यात पारदर्शकता आणावी, असे ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सांगितले.
टोल संदर्भात यापूर्वी ‘मनसे’ने आंदोलन केले होते. आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा हे पक्ष कुठेच दिसत नव्हते असा टोला त्यांनी ‘भाजप’ला हाणला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज टोलनाके बंद करण्याची घोषणा केली त्यात नेमके कोणते टोलनाके बंद होणार आहेत, आघाडी सरकराच्या काळातील टोलनाक्यांच्या बंदीचे काय झाले, ते खरोखरच बंद झाले होते की नव्हते, त्याचंी संख्या किती होती, आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले टोलनाकेही तेच आहेत का? अशा सवालांच्या फैरीही राज यांनी या वेळी झाडल्या.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2015 रोजी प्रकाशित
टोलनाके ‘कॅशलेस‘करा – राज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलबंदीबाबत केलेल्या घोषणेसंदर्भात त्यांचे अभिनंदन करतानाच सरकारच्या धोरणात पारदर्शकता नसल्याची टीका ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
First published on: 11-04-2015 at 03:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray slams govt toll issue