गणेश विसर्जन करून रात्री उशिरा माघारी परतणाऱ्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. गणेश विसर्जनादिवशी (दि. १५ सप्टेंबर) रात्रभर पश्चिम रेल्वे लोकल सेवा सुरू ठेवणार आहे. या निर्णयामुळे उपनगरात राहणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. विरार ते चर्चगेट व चर्चगेट ते विरार ही लोकल सेवा रात्रभर चालणार आहे.
गणेश विसर्जनावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी रात्री पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट अशा तीन फेऱ्या ठेवल्या आहेत. पहिली फेरी रात्री १.१५, दुसरी २.२५ तर तिसरी फेरी ही पहाटे ३.२० वाजता असेल. तर विरारवरून चर्चगेटपर्यंत चार फेऱ्या होतील. १२.४५, १.४० व २.५५ अशा फेऱ्या होतील.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2016 रोजी प्रकाशित
अनंत चतुर्दशीदिवशी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा रात्रभर सुरू राहणार
विरार ते चर्चगेट व चर्चगेट ते विरार ही लोकल सेवा रात्रभर चालणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 13-09-2016 at 09:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway continues local train on ganesh visarjan night